Monday 20 October 2014

शालेय शिक्षण





               लहानपणी मला शाळेतील दिवस आठवतात. अंगणवाडीचा पहिला दिवस. तेव्हा काही मुलांना इतका आनंद होता कि जणू आपण कुटे तरी दूर फिरायला जातोय. पण काही मुलं इतकी रडतात कि त्यांना वाटत कि आपल्याला कुटे तरी घरापासून दूर घेऊन जातायत आणि एका खोलीत डांबून ठेवतायत. काही मुलं ही हसत खेळत जातात. काही मुलांना असे सांगितले जाते कि शाळेत छान छान खाऊ मिळतो. मग ती हसत खेळत जायला निघतात. काही मुल हि शाळा डोक्यावर घेतात. शाळेमध्ये एकच आवाज घुमत असतो, तो म्हणजे रडण्याचा. मुलांचा रडवेला चेहरा बघून खूप वाईट वाटते, कारण त्यांना असं काही जबरदस्तीने शाळेत बसवले जाते कि जणू एखाद्या गोठ्यात गुरे बांधलेली असतात त्या प्रमाणे वाटते.   
               अहो हे कशाला तुम्हाला माझंच उदाहरण देतो. मी देखील जेव्हा लहान होता तेव्हा शाळेत जाताना खूप रडायचो. शाळेची वेळ जवळ आली कि माझ्या पोटात दुखायचे. माझे अंगणवाडी ते १० वी पर्यंतचे शिक्षण हे माझ्या आजोळात पार पडले. माझे आजोबा मला मारत झोडत शाळेत घेऊन जायचे. ते माझ्या बाजूला ६ महिने शाळेत बसले होते. माझ्या शिक्षणात माझ्या आजी आजोबांचा सिंहाचा वाटा आहे.
               आजकाल मिळणारी चित्रांची पुस्तक जशी असतात ती तशी का बर असतात ? याचं साधं उत्तर आहे ते म्हणजे शिक्षणाचं झालेलं व्यवहारीकरण किंवा व्यावसायिकीकरण. चित्रात जर तबेल्यात उभा असलेला घोडा दाखवला तर पुस्तकाची दृश्य स्वरुपाची पात्रता (Quality) कमी होते आणि त्यामुळे त्या पुस्तकाची किंमत देखील कमी होते. पुढे  जाऊन म्हणायचं तर जास्त किंमत असलेलं पुस्तक जर पालकांनी खरेदी केलं नाही तर त्यांना मुलांसाठी काही केल्याचं समाधान मिळत नाही यामागे मानसिकता अशी आहे की जर काही पालक मुलांसाठी वेळ खर्च करू शकत नसतील तर त्यांना गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करून त्यात समाधान मिळवावं लागतं.
               एखाद्या वेळेस मुलांना एखाद्या प्राण्याचे चित्र दाखवले तर तो म्हणेल कि हा प्राणी कोण आहे त्याला जर माहीत असेल तर चटकन उत्तर देईल नाही तर माहित असल्यास सांगू शकतो कि घोडा आहे. मग मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात कि तो काय खातो ? काय पितो ? कोठे झोपतो ? त्याला पाय किती ? शेपूट किती ? इ. प्रश्न विचारतात असं केल्याने मुलं स्वतःहून शोध घेऊ लागतात. हा शोध सुरुवातीला उपलब्ध असलेल्या ज्ञानाशी निगडीत असतो जो पुढे जाऊन नवीन शोध घेण्याकडे म्हणजेच उपलब्ध ज्ञानात भर टाकण्याकडे वाटचाल करू लागतो. समोरील प्राण्याला किंवा वस्तूला काय म्हणतात किंवा जी काही म्हणतात ते ओळखण यासं ज्ञान संपादन करणं म्हणतात. परंतु ज्ञान मिळवण हा शिक्षणाचा केवल एक भाग आहे. शिक्षणाचा खरा हेतू आहे तो म्हणजे शोध घेणं आणि घेतलेल्या किंवा लागलेल्या शोधाची चिकित्सा करण्याची प्रवृत्ती निर्माण करणं. आजकाल जे शिक्षण आहे ते पूर्णपणे व्यावहारिक किंवा व्यावसायिक शिक्षण आहे. त्याचा पूर्ण भर हा निव्वळ ज्ञान, निव्वळ यश, निव्वळ पदवी, निव्वळ हुशारी, निव्वळ मोठेपणा, मिळवण्याचा आहे.
               अर्थात, शिक्षण हा विषय एवढाच मर्यादित नाही तर पुढे  जाऊन खूप व्यापक आणि तितकाच गंभीर देखील आहे. शिक्षणातील यश-अपयशाशी संबंधित असलेला ताण तणाव, मुलांमध्ये वाढत जाणाऱ्या ताणतणावांमुळे होणाऱ्या आत्महत्या, शिक्षणसंथ्येकडून मागितली जाणारी भरमसाठ फी \शुल्क वैगेरे, एकंदरीत शिक्षणांच झालेलं बाजारीकरण आणि त्या बाजारीकरणाला मिळालेलं अवास्तव महत्त्व याला आपण बळी तर पडत नाही ना याचा विचार प्रत्येक पालकाने करण गरजेचं आहे.


               शाळेची गरज उरली नाही तर काय होईल ? आता शाळेत नक्की कोणतं शिक्षण दिलं जात आहे ? शाळा हा एक केवळ दिखावा झाला आहे का ? नक्की शाळेत जे दिलं जातं त्याला शिक्षण म्हणता येईल का ? शाळेत होणारे बदल नेमके कुठल्या दिशेने जात आहेत ? मुळात मुलांनी शाळेत नेमकं का जायचं, हे सगळ्या घटकापर्यंत पोहोचवलं आहे का ? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांचा सर्वांनी विचार करावा आणि आपापल्या मुलांना चागले शिक्षण दयावे  आणि त्याच आयुष्य उज्ज्वल बनवावं आणि समाजात त्यांची ख्याती वाढावी हि आपणास  विनंती !

No comments:

Post a Comment