Monday 24 November 2014

व्यसनमुक्ती काळाची गरज

                                व्यसनमुक्ती काळाची गरज 

     

 आजची तरुणाई हि खरचं खूप व्यावहारिक, हुशार आणि आपल्या करिअर बद्दल वास्तववादी आहे. भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर असून इथल्या कृतीशीलतरुणांची वाढती संख्या आणि त्याच्या उत्तरोत्तर होणारी प्रगती हि खरचं अभिमानास्पद गोष्ट आहे. तंत्रज्ञान आणि वाढत्या स्पर्धेमध्ये विविध क्षेत्रांशी, देशांशी संबंध जोडणारी हि पिढी भारताला प्रगतीपथावर नेण्यासाठी उत्तम कामगिरी करतेय यात वाद नाही . या स्पर्धेत जात, वर्ग, वंश, शहरी, ग्रामीण, असा तुरळक भेद जरी आढळत असला तरी स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याची हि मुख्य लढाई आहे हे वास्तव दररोज नजरेस पडत असतं. पण या सर्व प्रवाहात येणाऱ्या ताणतणावाला तितक्या सक्षमपणे हि पिढी हाताळताना दिसतं नाही. 
          स्पर्धेच्या युगात कामाला असणारा भरमसाठ व्याप आणि येणाऱ्या एकटेपणा स्वप्नांच्या आधारे दूर करण्याची सवय आजकाल कित्येकांना लागलेली दिसते. आजच्या पिढीतील कित्येकजण व्यसनेच्या अधीन गेले आहेत. नातेसंबंध जबाबदारी आणि वाढत्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे हि पिढी व्यसनाधीन झाली आहे. करिअरच्या मागे धावण्यात अधिकाधिक वेळ जात असल्याने या पिढीच्या वैयक्तिक  आयुष्यात बरीच हालचाल होताना दिसते. त्यामुळे हि पिढी कुठेतरी मानसिक आधार शोधण्यासाठी प्रयत्न करत आहे. हा मानसिक आधार कशातच मिळाला नाही  तर ते व्यसनाच्या आहारी जातात. अनेक वेळेस परस्परांमध्ये होणारे मतभेद गरजांची अपूर्णता, शौक म्हणून व्यसन केलं जात, पण काही काळानंतर हे व्यसन हे त्याच्या आयुष्यांच्या अविभाज्य भाग बनतो. संपूर्णपणे व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत त्यांची जाणीवही त्यांना होत नाही . 
          अंमली पदार्थाचं सेवन करन, धुम्रपान करण, मद्यपान करण, हे काही निव्वळ श्रीमंत वर्गा पुरत मर्यादित नाही तर ग्रामीण भागात सुद्धा तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनात आकंठ बुडालेले आपल्याला पाहायला मिळतात. या तरुणांसाठी अनेक वेळा शहरापासून थोड्या दूर असलेल्या पब्ज, डिस्को किंवा हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्ट्या आयाजित केल्या जातात. या रेव्ह पर्त्यामध्ये तसचं नवीन वर्षाच्या स्वागतांसाठी आयाजित केलेल्या पार्ट्या मध्ये तरुणांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकार पॅकेजेस दिली जातात . या पार्ट्या मध्ये केवळ तरुणांना दारू दिली जाते असं नाही तर या पार्ट्या द्वारे तरुणांना सहज अंमली पदार्थ पुरवली जातात. या अंमली पदार्थाची विविध भागातून आयात केली जाते आणि या पदार्थांचं सेवन करण्यात तरुणांना भाग पाडले जाता. एकदा का तरुणांना या अमली पदार्थ घेण्यात त्यात असतात. 
          आज खूपच कमी वयात व्यसनाधीन झालेली मुल आजकाल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. शाळेमधील विद्यार्थ्यालाही अंमली पदार्थाची सवय लागल्याच्या अनेक घटना आहेत. केवळ हौस म्हणून अमली पदार्थाचं या मुलांकडून सेवन केलं जात आणि नंतर हि मुल संपूर्णपणे या पदार्थाच्या आहारी जातात . . अनेकदा फ्रेंडशिप क्लबच्या नावाखाली तरुण-तरुणीना आर्थिकदृष्ट्या लुबाडलं जात, तर काही वेळा या माध्यमांतूनही हे अमली पदार्थ विकले जातात. आज गांजा, हेरोईन , अफू यासारख्या पदार्थाची मागणी युवकांमध्ये वाढत आहे आणि हे त्यांना गुप्तपण पुरावालेदेखील जाताहेत. 
         मद्यधुंद अवस्थेत अनेकवेळा या मुलांकडून गंभीर गुन्हे घडतात. तसचं ते मुलीसोबत गैर वर्तन  करतात. अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी अनेक वेळा त्याच्याकडून चोरी, दरोडे , खून याच्यासारखे गुन्हे घडतात. त्यामुळे या अंमली पदार्थामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारत देश हा तरुणांचा देश म्हणून संबोधला जातो. पण जर तरुण मोठ्या प्रमाणावर व्यसनाच्या आहारी जात असेल तर कोणत्या प्रकारे त्या देशाची प्रगती घडू शकेल? त्यामुळे अशा पिढीचा देशाला काही उपयोग होईल का हि शंकाच आहे. महाराष्ट्र राज्याने गेल्या कित्येक वर्षापासून व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम हाती घेतले पण व्यसनमुक्त भारत निर्माण करण्यासाठी निव्वळ योजना राबवून उपयोग नाही. तर या पिढीची क्मानासिकता बदलण्यासाठी गरज आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीचा  सन्मान कराण्यासाठी त्यांना तयार करण्यासाठी आवश्यकता आहे. आयुष्यात नातेसंबंधातील ताणताणाव दूर करण्यासाठी व्यसनाचा आधार घेण्याची गरज हे त्यांना पटवून देण्याची गरज आहे तसचं अनेकवेळा सोशल मिडीयाच्या माध्यमातून रेव्ह पार्ट्या, आयोजन केले जात त्यामुळे सायबर गुन्हे विभागाने याकडे लक्ष दिल पाहिजे. व्यसनमुक्तता हे काही एका दिवसाचे काम नाही, पण योग्य मार्ग अवलंबून तरुणांना या व्यसनांच्या जाळ्यातून मुक्तता मिळवून दिली पाहिजे .





1 comment: