Thursday 16 October 2014

वाचतो कोण ?

                                                 वाचतो कोण ?


        आजकालच्या  यंग पिढीचे वाचनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे . त्यांना शोर्ट मध्ये  वाचन करायला आवडते . आज बघायला गेलो  तर तंत्रज्ञानाचे युग आहे . facebook , twitter , whatsaap , इत्यादी साईट्स कॉम्पुटर आणि स्मार्टफोनवर उपलब्ध असतात . या साईटवर शोर्ट मथळा वाचण्याची सवय सर्वांना लागलेली आहे . मराठी चित्रपट कलाकार किती वाचतात , काय वाचतात , कशाला वाचतात , असे अनेक प्रश्न निर्माण होतात , वाचतात म्हणजे नेमके काय ? कथा , कादंबरी , आत्मकथन , चरित्रकथन , कवितासंग्रह , अशा वाचनाबाबत हा प्रश्न आहे कि , प्रसारमाध्यमांबाबत हा प्रश्न आहे ? म्हणजे वृत्तपत्र । साप्ताहिक । मासिक । वार्षिक । दिवाळी अंक । याचं वाचन म्हणायचं कि मोबाईल वरचे sms , न्यूज वाचन म्हणायचं ? 
          आगामी चित्रपटाची पटकथा वाचन नाटकाची संहिता वाचन हे देखील वाचनच ! 
          आज इतकं गतिमान आयुष्य आणि त्यात शेकडो काम , त्यातून नेमकं कलाकार वाचन  तरी कधी करणार आणि वाचायचं म्हटले तर नेमके काय वाचन करायचे ते ठरवणार ? वर्तमानपत्राच्या मुख्य महत्त्वाच्या बातम्याचे मथळे देखील वाचायला वेळ नाही अशी अनेक कलाकारांची परिस्थिती आहे . चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अत्यंत गोड मुलाखतीच वाटप करण  , न कंटाळता तेच तेच करण , आपल्याकडे येणारी 'सुपारी' दुसरीकडे जाऊ नये याची काळजी घेण , अशा असंख्य गोष्टीत वाचणार ते कधी आणि किती यापेक्षा वाचायला ते कशाला ? असा काय मोठा स्वतःच्या आयुष्यात बदल घडवतोय अशा भावना निर्माण होते. 
          वाचनाने भाषा सुधारते , आत्मविश्वास वाढतो , व्यतिमत्त्वात प्रगल्भता येते , अभिनयाची त्याचा खोलवर फायदा होतो. असे म्हटल्यावर काही कलाकार म्हणतात कि पन्नाशीनंतर ठीक आहे हो , आता कशाला ? 
          मग वाचन कोणत्या पातळीवर राहत ?
          स्वतःच्याच नाटक - चित्रपटाची परीक्षण वाचायचे हि कष्ट फार कमी कलाकार घेतात. करणार्यांना माध्यमातील काही समजत नाही असे समजले जाते . 
          पानोपान मजकूर वाचण्यापेक्षा whatsaap वरचा शोर्ट मजकूर खूप चांगला वाटतो. मुद्दा समाजाला न मग बस्स अस म्हटलं जात. मराठीत भरपूर साहित्य आहे. पण त्यावर नजर टाकण्याची इच्छा हवी. त्यासाठी स्वतःचा वेळ स्वतःच्या जडणघडणीसाठी घ्यायची भावना हवी. स्वतः वाढलो तर कोणी धक्का देत नाही , त्याचा एक मार्ग वाचनातून जाते.
          सदाशिव अमरापूरकर , सचिन खेडेकर , उपेंद्र लिमये , अतुल कुलकर्णी , मिलिंद गुणाजी , सुबोध भावे , जितेंद्र जोशी , मृणाल कुलकर्णी , सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ ) , अमृता सुभाष , मिलिंद गवळी , हे जास्त चांगले वाचक म्हणून ओळखले जातात . या प्रत्येकाच्या प्रगती पुस्तकाबाबत पुन्हा वेगळे काही सांगायला नको . या प्रत्येकाने अभिनय क्षेत्रात फार मोठी कामगिरी केली आहे . पण वाचनाने त्याच्या वागण्यात -विचारात , दुष्टीकोनात भरपूर बदल येत गेला . तो त्याच्याच पथ्यावर पडला . वर्षा उसगावकर , निशिगंधा वाड , मकरंद अनासपुरे , अशी हि यादी वाढवता येईल , सेटवर अथवा कुठल्याही अन्य जागी पुस्तक वाचले म्हणून आपण  जुनाट झालो असं नाही . पण त्यासाठी स्वतःवर लक्ष हवं .
           
             मराठी चित्रपटसृष्टीच्या ' कॅ^लिडोस्कोप ' मध्ये वाचन या प्रकाराला कोपरा मिळालाय , यातच बरेच प्रश्न पडतात , उत्तर न मिळणारे ………
          अशा  प्रकारे प्रसंगी अखंडीत वाचत जावे। असे समर्थ रामदास स्वामीनी यांनी सांगितले आहे . वाचनाने खूप ज्ञान मिळते . पुस्तक हे आपले दुसरे गुरु असतात . त्यामुळे आजकालच्या मुलांनी खूप वाचावे आणि आपले चांगले व्यतिमत्त्व घडवावे .   

No comments:

Post a Comment