Tuesday 7 October 2014

वक्ता कसा असावा

    

 

 सर्वसाधारणपणे वक्तृत्वाचा अर्थ ‘बोलणे’ असा केला जातो. मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाला काही तरी बोलायचे असते. एवढेच नव्हे तर पशु पक्ष्यांना, झाडावेलींना परस्परांबरोबर विविध विषयांवर बोलायचे असते. आपल्या मनातील खळबळ दुसऱ्या कोणाला तरी सांगायची असते. अर्थात आपल्या मनातला हा भाव दुसऱ्या समोर प्रगट करताना विविध प्रतिमांचा किंवा प्रतिकांचा वापर प्रत्येकजण करत असतो. त्यासाठी विविध प्रकारच्या शब्दांचा , चित्राचा , रंगछटांचा, अंगविक्षेपांचा अवयवांचा, मुद्रांचा, वस्तू वा प्राण्यांचाही उपयोग करून आपण आपल्या मनातील विचार दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. जी माणसे कमी बोलतात त्यांना आपण ‘घुमी’ म्हणतो. तर जी माणसे जास्त बोलतात त्यांना आपण वाचाळ किंवा तोंडाळ म्हणतो. काही माणसे भडाभडा ओक्ल्याप्रमाणे आपल्या मनातले घडाघडा बोलुन ओकून टाकतात, काही आतल्या गाठीची माणसे आवश्यक तेवढेच बोलतात, काही माणसांना विचार करून बोलण्याची सवय असते, काही माणसे आपल्या मनातले बोलून झाल्यावर त्याबद्दल विचार करीत असतात. काही माणसे बोलण्यात पटाईत असतात, काही माणसे बोलताना चतुराईने बोलतात .    

      प्रत्येक जीव आपल्या ज्ञानेन्द्रियाच्या माध्यमातून विविध प्रकारचे अनुभव घेत असतो. पावसाची पहिली सर अंगावर पडल्यानंतर, आकाशामध्ये इंद्रधनुष्याची सुंदर सप्तरंगी कमान दिसल्यानंतर, झुंजूमुंजू झाल्यावर, प्रिया मिलनानंतर, नवनिर्मितीनंतर या व अशा प्रकारच्या आपण घेतलेले अनुभव उत्स्फुर्तपणे हृदयाच्या गाभाऱ्यातून उसळी घेऊन बाहेर येतात आणि त्याला शब्दरूप प्राप्त होते. प्राचीन काळापासून भारतामध्ये १४ विद्या आणि ६४ कला प्रसिद्ध आहेत. प्रत्येक माणूस आपले व्यतिमत्व घडविताना काही विद्या आणि काही कला आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, ६४ कलांमध्ये गायन, वादन, नृत्य, चित्र, या कलाप्रमाणे वकृत्व कलेचाही समावेश केला जातो.    

 बोलणाऱ्या दहा हजार व्यतीमध्ये एखादाच वक्ता असतो.

कसे बोलावे :-          

        माणसाने कसे बोलावे हि सांगताना संत नामदेव महाराज सांगतात, बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले | म्हणजे आपण अशारितीने बोलावे कि ज्यामुळे प्रत्यक्ष परमेश्वरालाही, विठ्ठलालाही आनंदाने दोलावे असे वाटेल. कीर्तनरंगामध्ये नाचत असताना, न्हाहून निघत असताद्ना सर्वत्र ज्ञानरूपी दिवे उजळले जातील असे बोलावे. आपल्या बोलण्याचा परिणाम म्हणून प्रत्येक्ष परमेश्वराने मान डोलवावी असे वाटत असेल तर त्यासाठी आपली भाषा, आपले शब्द किती चांगले असायला पाहिजेत, प्रभावी असले पाहिजेत, त्यातून कोणत्या प्रकारच्या भावना प्रगट  व्हायला हव्यात याचा विचार आपण सहजपणे करु शकतो. विठ्ठलाचा अर्थ जनता जनार्दन असाही करता येईल .

श्रेष्ठ वक्ता बनण्यासाठी वक्त्याजवळ काही विशेष गुणवत्ता असावी लागते. या गुणांपैकी काही गुणांची वक्त्याला निसर्गतः देणगी मिळालेली असते. तर काही गुण त्याला प्रयत्न करुन्कारून प्राप्त करावे लागतात, विकसित करावे लागतात.
          वक्त्याजवळ कोणते गुण असावेत ते पुढील प्रमाणे . 
  1.  वाचन :-  चांगला वक्ता होण्यासाठी चांगले आणि सतत वाचत राहिले पाहिजे, जो वाचेल तो वाचेल. समर्थ रामदास स्वामी सांगतात "प्रसंगी अखंडित वाचीत जावे ।। काही लोक वाचन करताना पानोपान वाचण्याची सवय असते पण त्यांना थोड्या वेळाने विचारले तर त्यांना काही सांगता येत नाही . वाचन करताना त्याचे वाचनामध्ये मन नसते . त्याचे लक्ष नसते. अशा प्रकारचे वाचन वक्त्याला उपयोगी नसते . 
  2. लेखन :-  श्रेष्ठ वाक्त्याजवळ आवश्यक असणारा हा दुसरा गुण म्हणजे लेखन होय. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'दिसामाजी काहीतरी ते  लिहावे। आपण जे वाचतो त्यातले महत्वाचे मुद्दे संपूर्ण संदर्भासह लिहून ठेवावे. म्हणजे आपल्या भाषणाची तयारी करताना आपण जे मुद्दे टाचनवहीमध्ये नोंदवून ठेवले आहेत ते आपल्याला उपयोगी पडतात. वक्त्याने दररोज काही तरी लिहिण्यासाठी सवय ठेवावी. 
  3. हजरजबाबीपणा :- वक्त्याजवळ आवश्यक असणारा तिसरा महत्वाचा गुण म्हणजे हजरजबाबीपणा होय. वक्ता बोलत असताना काही वाचाळ  श्रोत्यांना वक्त्यांच्या भाषणामध्ये मधेच शेरेबाजी करण्याची सवय असते. अशावेळी ती शेरेबाजी विनोद निर्माण करणारी असेल तर सर्व श्रोते शेरेबाजीवर मोठा हास्य निर्माण करतत. अशावेळी वक्त्याची मोठी गडबड उडून जते. पण जर वक्ता हजरजबाबी असेल तर तो त्या शेरेबाजीवर योग्य ती मत करू शकतो. आणि पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांना हसौयाची संधी मिळू शकते. आणि शेरेबाजी करणार श्रोता  गप्प बसतो. मग यापुढे त्या वक्त्याच्या भाषणामध्ये श्रोते शेरेबाजी करण्यापूर्वी १० वेळा विचार करतात. 
  4.  आत्मविश्वास :- श्रोत्यांसमोर उभे राहताना वक्त्याजवळ प्रचंड आत्मविश्वास असायला हवा. बऱ्याच  जणांना आपल्या समोर कोण बसलेले आहेत  म्हणजे  भीती वाटू लागते, बोबडीच वळते. आणि मग तत पप करू लागतात. असे झाल्यावर श्रोते वक्त्याची खिल्ली उडवतात. आत्मविश्वासाच्या अभावामुळे हि अशी अवस्था होते. 
  5. निर्भयता :-  वक्त्याजवळ आवश्यक असणारा पाचवा महत्वाचा गुण म्हणजे निर्भयता हा होय. वक्ता हा वृत्तीने निर्भय असला पाहिजे. इतरांची मते खोडून काढणारा किंवा आपली मते मांडताना वक्त्याने आपला मुद्दा अत्यंत निर्भयपणे आणि ठामपणे मांडला पाहिजे. विशेषतः वादविवादाच्या कार्यक्रमात, स्पर्धात्मक भाषणात जेव्हा श्रोत्यांना आपली मते ठासून  सांगायचे असते. त्यावेळी निर्भयतेची आवश्यकता लाभते त्याचबरोबर सभेमध्ये उपस्थित असलेल्या श्रोत्यांकडे पाहताना, शेरेबाजीला सामोरे जाताना  अशा प्रकारची निर्भयता खूपच महत्वाची ठरते.  
  6. व्यासंग :-  वक्त्याजवळ आवश्यक असणारा एक महत्त्वाचा गुण म्हणजे व्यासंग होय. हा व्यासंग अनेक बाबतीत आवश्यक आहे. वाचन, लेखनाचा व्यासंग असणे हे चांगल्या वक्त्याला आवश्यक आहे. भाषणे, कीर्तने, प्रवचने ऐकण्याचा, त्यातले बारकावे जाणून घेण्याचा, त्याची लकब अभ्यासण्याचा, त्याच्या शैलीचा विचार करण्याचा व्यासंग वक्त्याला हवा.
  7. मुत्सद्दीपणा :-  वरवर पाहता असे वाटते कि मुत्सद्दीपणा या गुणाची प्रामुख्याने राजकारणी लोक आणि वकिलीचा व्यवसाय करणाऱ्यांनाच गरज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नसते. ज्यावेळी एकाच विषयावर, एकाच विषयाला धरून आकापेषा जास्त वक्ते विषय मांडणार असतात त्यावेळी किंवा वादविवाद स्पर्धेच्या वेळी अशा प्रकारच्या मुत्सद्दीपणाची नितांत गरज असते. 
  8. विनोदबुद्धी :- समर्थ रामदास स्वामी म्हणतात, 'टवाळा आवडे विनोद ।' असे असले तरी वक्त्याजवळ विनोदबुद्धी असावी लागते. दुसऱ्याने  केलेले विनोद ज्याप्रमाणे आपल्याला कळायला पाहिजे त्याचप्रमाणे त्याच्या विनोदाला योग्य ती दाद दिली गेली पाहिजे हि कला देखील आपल्याला जमायला पाहिजे. ज्याप्रमाणे व्यासंगाची गरज आहे त्याचप्रमाणे विनोदबुद्धीची  हि गरज आहे.
  9. श्रोत्यांची परीक्षा घेण्याचे कसब :-  वक्त्याजवळ श्रोत्यांना समजून घेण्याचे त्याची त्याच्याही नकळत परीक्षा घेण्याचे कसब असावे लागते. वक्त्याला श्रोत्यांची नाडी ओळखता आली पाहिजे. मग वक्ता आपल्या विषयाची योग्य पद्धतीने मांडणी करून मग आपल्या विषयाचा योग्य विचार करू शकतो. त्यासाठी सर्वसाधारण सभेत बसल्यानंतर कोणत्या प्रकारचे श्रोते आले आहे हे पहिले वक्त्याने ओळखले पाहजे. उदा.  श्रोत्यांमध्ये शिकलेले किती ? अशिक्षित लोक किती ? स्त्रिया किती ? पुरुष किती ? वृद्ध किती ? तरुण किती विनोद किती जणांना आवडतो किंवा नाही ? त्याच्या समोर कसे भाषन केले तर आपल्या भाषणाला कशी दाद मिळेल ? अशा विविध प्रश्नाची उत्तरे त्याची त्यानेच मिळविण्याची कसब वक्त्याजवळ असावे लागते. 
  10.  विषयाचे ज्ञान :-   वक्त्यासाठी, वकृत्वासाठी आवश्यक असणारा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे विषयज्ञान होय. शरीरामध्ये ज्या प्रमाणे प्राण महत्त्वाचा त्याचप्रमाणे वक्त्याला आवश्यक असणारा हा गुण होय. ज्या विषयावर आपल्याला बोलायचे आहे त्याचे यथोचित ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे त्या विषयाचे ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. पुस्तक वाचणे, चिंतन, मनन करणे, अत्यंत आवश्यक आहे.  यासाठी विषयाचा विचार करताना वक्त्याने प्रथम आपला विषय कोणता आहे ते नित समजून घेणे आवश्यक आहे. 
  11. विषय विवरणाची  सवय :-  आपल्या व्याख्यानाचा विषय स्पष्ट करीत असताना वक्त्याने क्रमाने आपल्या विषयातील मुद्द्याचे विवरण करण्याची सवय आत्मसात करायला  हवी. विषय प्रवेश, विषयाची स्पष्टीकरण, त्यासाठी आवश्यक असणारे संदर्भ, विषय परिपूर्ण करणारे मुद्दे आणि अखेरीस स्वमत प्रदर्शन करून त्या विषयाचा योग्यरित्या चिरफाड करता आली पाहिजे म्हणजे श्रोत्यांच्या अनेक शंकांना नकळतच उत्तर मिळते.
  12. विशिष्ट पद्धतीने विचार करण्याची सवय :-  विषय विवरणाची सवय वक्त्याला त्यावेळीच लागते ज्यावेळी आपण विशिष्ट पद्धतीने विचार करू शकतो.वक्त्याने नेहमी सकारात्मक भाषेत बोलले पाहिजे आणि नकारात्मक भाषेत बोलणे टाळले पाहिजे. अर्थात  नकारात्मक बोलणे हे त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. वक्ता जर सकारात्मक विचाराचा असेल जीवनाकडे सकारात्मक दुष्टीने पाहणारा असेल तर स्वाभाविकच त्याचे बोलनेसुद्धा सकारात्मक होते त्याचा परिणामहि चांगला होतो 
  13. भाषणातील गतीचे नियंत्रण :- वक्ता बोलत असताना त्याच्या तोंडून बाहेर पडणारे  शब्द हे विशिष्ट गतीने बाहेर पडत असतात. उदा . अटल बिहारी वाजपेयी बोलत असताना  त्यांच्या दोन शब्दांमध्ये , वाक्यामध्ये भरपूर वेळ असतो .त्यामुळे त्यांचे भाषण अत्यंत शांततेने होते. याउलट शिवाजीराव भोसले ज्यावेळी विषय मांडत असतात त्यावेळी त्यांच्या दोन वाक्यांमध्ये ऐकणाऱ्याला जरा सुद्धा उसंत मिळत नसे. पहिले वाक्य संपले कि लगेचच दुसरे वाक्य उच्चारले जायचे . 
  14. भाषाशैली :- भाषाशैलीचा विचार करताना वक्त्याने आपल्या समोर सुशिक्षित प्रकारचे बसले आहेत ,याचा विचार करणे आवश्यक आहे. सुशिक्षित आणि उच्चविद्याविभूषित लोकांसमोर विषय मांडताना आपली भाषा देखील त्याच प्रकारची म्हणजे अश्या श्रोत्यांना आनंद देणारी असली पाहिजे . श्रोत्यांना दिले जाणारे संदर्भ हे मोठमोठ्या लोकांच्या आयुष्यातील घटकांचे विचारांचे असले पाहिजे .लोकांना इंग्रजी , संस्कृत भाषेतील संदर्भ देणे आवश्यक ठरेल .
  15. आवाज :-   वक्त्याचा आवाज हि त्याला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे पूर्वी ज्या वेळी ध्वनिक्षेपाकासारखी साधने नव्हती तेव्हा वक्त्याचा आवाज दणदणीत असावा अशी अपेक्षा असायची .वक्त्याने आपले भाषण राणाभीमदेवी थाटात करावे, गर्जना करून करावे असे आचार्य अत्रे म्हणत असत .अश्या वेळी आवाज कमविण्यासाठी विशिष्ट मेहनत घ्यावी लागत असे . आचार्य अत्रे म्हणतात त्यांनी हा आवाज कमविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. उघड्या माळरानावर जावून दोन्ही गाळात दोन गोट्या किंवा  सागर गोटे ठेवून मोठ्याने ओरडून बोलण्याचा सराव अत्रे करीत असतं त्यामुळे त्यांचा आवाज दणदणीत झाला होता . त्यामुळे माईक नसला तर पाच - दहा हजार लोकांना सहज आवाज ऐकायला जात होता. 
  16. अभिनय :-  श्रोत्याला आकर्षित करून घेण्यासाठी, त्याचे मनोरंजन करण्यासाठी वाक्त्याजवळ आवश्यक असणारा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे त्याचा अभिनय . त्याचे अभिनय कौशल्य ,वक्तृत्व हा एक प्रकारे एकपात्री नाट्य प्रयोग आहे . अश्या वेळी भाषणातील आशयाला धरून अभिनय केल्यास त्याच्या भाषणाची लज्जत खूपच वाढते . आपल्या चेहर्याचा योग्य तो वापर वक्त्याने करून घ्यायला हवा . डोळे लहान मोठे करून , चेहऱ्यावरील रेषा लहान मोठ्या करून ,वक्ता श्रोत्यांशी संवाद साधू शकतो, डोळ्यांची भाषा समोरच्या माणसाला पटकन समजते . 
  17. उच्चार :-  वक्त्याचे शब्दोच्चार स्पष्ट आणि स्वच्छ असावेत. उच्चारला जाणारा शब्द योग्य पद्धतीने आणि सुस्पष्ट रीतीने उच्चारला गेला म्हणजे श्रोत्यांना तो नित कळतो. अन्यथा त्यातून महाभारत घडते. 
                    अशा रीतीने प्रत्येक वक्त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे वक्त्यासाठी आवश्यक गुण आत्मसात करून आपले भाषण अधिकाधिक रंजक आणि परिणामकारक कसे करता येईल याचा विचार करावा. 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे', हे ध्यानात ठेऊन प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न करावा. भाषण हि कला असून ती कष्टसाध्य आहे.हे ध्यानात घेऊन या क्षेत्रात ज्याला नाव कमवायचे आहे अशा वक्त्याने हि कला आत्मसात करण्यासाठी या सर्वांचा सूक्ष्म अभ्यास करून हि कला आत्मसात करावी .

20 comments:

  1. खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद

    ReplyDelete
  2. सर आपल्याशी संपर्क कसा साधावा. या क्षेत्रात आपल्या कडून भरपूर शिकण्याची संधी मिळेल. कृपया संपर्क मिळावा

    ReplyDelete
  3. खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद

    ReplyDelete
  4. धन्यवाद आपले... एका पुस्तकात जेवढी सविस्तर माहीती असते पण वाचनासाठी बराच वेळ लागतो त्यासाठी आपण तीच माहीती एकाच लेखात सामवुन सर्वभार कमी केलात ..तेपण मुद्देसुत.. धन्यवाद

    ReplyDelete
  5. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  6. धन्यवाद सर खुप माहिती भेटलि आपल्या शि संपर्क कस क रावा

    ReplyDelete
  7. सर परिपूर्ण वक्ता होण्यासाठी आवश्यक सर्व गुण आपण आपल्या ह्या लेखात समजावून सांगितले.


    ReplyDelete
  8. खुपच छान माहिती मिळाली आपले मनपूर्वक धन्यवाद .

    ReplyDelete
  9. Sir nice....majha wtsp number 7795705323 Pramod sutar

    ReplyDelete
  10. Sir class vagere lavale tar best rahil tyasathi konta class lavaycha p/z call me 8788153466

    ReplyDelete