Monday 13 October 2014

पंचरंगी राजकारण

       

                            महाराष्ट्रातील पंचरंगी निवडणूक 






   शिवसेना - भाजप गेले २५ वर्षे युती होती. ही युती बाळासाहेब ठाकरे आणि  प्रमोद महाजन यांनी घडवून आणली. कालांतराने प्रमोद महाजन यांचे आकस्मित निधन झाले.त्यानंतर ही बाळासाहेबांनी ही युती कायम ठेवली होती.पण आता बाळासाहेब हे देखील नसल्यामुळे युती तोडली गेली.युती तुटण्याचे  खरे कारण हे भाजपच आहे असे आरोप हा शिवसेनेने केला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी याची आघाडी ही १५ वर्षाची होती. ही आघाडी शरद पवार व सोनिया गांधी यांनी घडून आणली होती. पण आताच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटल्या बरोबर आघाडी ही तोडली गेली.
          महाराष्ट्रामध्ये २५ वर्षानंतर पंचरंगी निवडणूक होणार आहे. पंचरंगी निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे प्रमुख पाच पक्ष आता पुढे उभे राहिले आहेत. या पाचही पक्षामध्ये अतितटीची स्पर्धा लागलेली आहे. अनेक पक्षांच्या सभावर सभा महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे ही निवडणुका कोण जिंकणार आणि कोणाचा मुख्यमंत्री होणार याकडे सगळ्यामुळे लक्ष लागलेले आहे.
          सध्याची स्थिती पाहता असे दिसून येते कि भाजप हा सर्वत स्वबळावर लोकसभेत बहुमताने निवडून आलेला पक्ष आहे. भाजपाने जी काही मेहनत केली होती, ती पणाला लावून बहुमताने मोदी यांना जिंकून पंतप्रधानाच्या पदी बसून दिले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी  यांनी स्वतः पूर्ण देशात  ३०० हून  जास्त सभा घेतल्या होत्या.त्यांनी आपला चेहरा आणि गुजरात मॉडेल हे लोकांच्या डोळ्यात सारखे बिंबवत होते. त्यामुळे त्यांना याचा फायदा हा  लोकसभेत चांगला झाला. पण आताही विधानसभा निवडणुकीत भाजपाने हेच सूत्र हाती घेतले आहे. म्हणजे थोडक्यात मोदींना पुढे केले आहे. तसे पाहता शिवसेना बाळासाहेबांपासून ते आता उद्धव ठाकरे पर्यंत असे दिसून येते कि महाराष्ट्रात शिवसेनेचेच वर्चस्व आहे.
          भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे मोठ्या प्रमाणात प्रचार करताना आपल्याला  महाराष्ट्रात दिसतात. मोदी यांनी आताच अमेरिका दौरा करून आले आहेत तेव्हा त्यांनी असे वक्तव्य केले होते कि मी महाराष्ट्रात २० ते २५ प्रचार सभा घेणार हे त्याचे सभा सत्र अखंड चालू असल्याचे आपल्याला दिसतंय.मोदीमुळे भाजपचे पारडे जड आहे असे  दिसून येते.
          काही  लोकांचे असे मत दिसते कि भाजप ही स्वार्थी आहे. कारण शिवसेनेबरोबर २५ वर्षाची युती होती जेव्हा लोकसभेत भाजप स्वबळावर निवडून आली. त्या नंतर त्यांना शिवसेना जड वाटू लागली मग शिवसेने बरोबरचे कायमचे संबंध तोडले. शिवसेना ही काही use  and thro वस्तू नाही आहे, असे लोकांनी भाजपला करारा जवाब विचारलेला आहे. भाजपचा लोकसभेतील विजय पाहता त्यांना आता असे वाटू लागले  ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही स्वबळावर जिंकून येऊ असा भाजपचा हट्टाहास दिसून येतो.
          शिवसेना आणि भाजपची युती संपुष्टात आली. तसा रिपाई पक्षाने देखील शिवसेनामधून आपला काढता पाय घेतला.भाजपच्या गोठात सामील झाले. आठवले यांचे असे म्हणणे आहे कि आम्हाला इतकी वर्षे शिवसेने काहीही दिलेले नाही मग आंम्ही का राहू. आम्ही तुमचा पाठिंबा सोडतोय. जो पक्ष आता आम्हाला साथ देईल त्याच्याच मागे जाऊ असे रामदास आठवले यांनी वक्तव्य केले. पंचरंगी निवडणूक असल्यामुळे सर्व पाच हि पक्ष आपली ताकद पणाला लावून आणि स्वबळावर निवडून येण्याचा खूप प्रयत्न करतायत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक असणार आहे.
          शिवसेना हिंदू दृदय सम्राट असे ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे हे जेव्हा होते तेव्हा शिवसेनेकडे मोठी शक्ती होती. पण त्याचे निधन झाल्यावर अनेक जणांना असे वाटत होते  बाळासाहेब गेले आता शिवसेनेचे काय होणार उद्धव ठाकरे ह्यांच्यावर लोकांचा विश्वास नव्हता त्यांना असे वाटले कि आता शिवसेना संपुष्ठात आली. उद्धव ठाकरेंनी हा लाकांचा विश्वास खोटा  ठरवून आपली एक वेगळीच इमेज निर्माण केली आहे तर आता असे दिसून येते कि शिवसेना हि संपुष्टात नाही येणार. शिवसेनेला कणखर नेतृत्व मिळालेले आहे त्यामुळे सेनेची  सध्याची स्थिती चांगली दिसतेय. 
          २०१४ ची विधानसभा निवडणूक जी आहे त्या निवडणुकीमध्ये प्रथमच प्रमुख ५ पक्ष स्वतंत्र लढत आहे त्यात शिवसेनेची व भाजपची तुटलेली  युती. पण आता असे दिसून येते कि शिवसेना आणि  मनसे एकत्र येतील असे अनेकदा बातम्यातून व भाषणातून दिसून येते काही दिवसापूर्वी असे वक्तव्य राज ठाकरेने केले आहे कि मी लोकसभा निवडणूक लढणार नाही. याचा सरळ सरळ असा अर्थ होतो हि भविष्यात शिवसेना व मनसे याची युती होणार.  
          विधानसभा निवडणुकीमध्ये जो पक्ष निवडून  येईल तो ५ वर्ष सत्ता करेल मग ज्याची सत्ता त्याचीच वाजेल डंका. भविष्यात महाराष्ट्रात राजकारण कि सत्तेवरील पक्ष यांचे वर्चस्व असेल हे थोड्याच दिवसात कळेल. सध्या जे वातावरण आहे त्यावरून असे लक्षात येते कि कुठल्याही एका पक्षाला महाराष्ट्रात सत्ता मिळणे अशक्य आहे. अशावेळी निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेना- भाजप सत्ता स्थापन करू शकतात. मात्र मुख्यमंत्री कोणाचा हा पेच महत्त्वाचा असेल. तर दुसरीकडे भाजप राष्ट्रवादी यांचे सरकारची गणित जरी अशक्य वाटत असली तरीही हि नाकारता येणे शक्य नाही. ह्या निवडणुकीत मनसेच्या यशापयशावर हि बरच काही अवलंबून आहे आणि अलीकडच्या काळात शिवसेनेची झालेली जवळीक यातून नवीन राजकारण उदयास आले तर नवल  वाटायला नको. पंचरंगी लढतीत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली गेली तरी कुणा एका पक्षाला बहुमत मिळण अशक्यप्राय गोष्ट आहे.  

No comments:

Post a Comment