सत्यमेव जयते
अमीर खानचे व्यक्तिमत्त्व आणि फिटनेस खूप कमालीचा आहे. पण काही दिवसापूर्वी
तो आपल्या आगामी चित्रपट पी. के च्या पोस्टर वरून खूप चर्चित झाला. पण त्याने असे
सांगितले आहे कि ह्या चित्रपटामध्ये वेगळी काहीतरी पाहायला मिळणार आहे. त्याची
उत्सुकता आता सर्वांना लागलेली आहे कि नवीन काही तरी पाहायला मिळणार. तर लवकरच आपण
पाहू.
पण सध्या अमीर खान हा छोट्या पडद्यावर
पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. ते म्हणजे त्याचा सुपर डुपर शो सत्यमेव जयते घेऊन. हा शो स्वतः अमीर खानने सुरु केलेला शो
आहे. आपल्याला आता असे वाटत असेल कि एवढा मोठा शो त्याने निर्माण केला आहे.
तर तो खूप शिकलेला
असेल असा अनेकांच्या मनाला वाटत असेल. पण त्याने त्याच्या पहिल्या सत्यमेव
जयतेच्या शोमध्ये स्वतःच्या तोंडून सांगितले कि माझ्याकडे कोणत्याही प्रकारची
डिग्री नाही किंवा डिप्लोमा certificate
नाही
मी फक्त १२ वी पर्यंतच शिक्षण
घेतले आहे. भारतामध्ये खेळाला दुर्लक्ष केले जाते. यामध्ये माध्यम सरकार आणि आपण सर्वच
सहभागी आहोत.क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळ भारतात आहेत. याची जाणीव हि आपल्याला नसते
हेच आपले दुर्दैव. सत्यमेव जयते या अमीर खानच्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाची tag line हि ‘मुमकिन है | ‘ अशी
आहे. आणि या पर्वाची सुरुवात क्रीडा क्षेत्रातून केली गेली याबद्दल अमीर खानचे
विशेष कौतुक. याचा अर्थ असा कि कमी शिक्षित लोक ही जीवनात खूप पुढे जाऊ शकतात. याच
जागत उदाहरणं हे अमीर खान आहे.
५
ऑक्टोंबर पासून सत्यमेव जयते हा कार्यक्रम सुरु झाला. त्यात अमीरखानने खेळाला खूप
महत्त्व दिले आहे. आणि हे खरंच आजकालची मुल हि खेळाकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
सध्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात दिसतो तर सर्वजन तांत्रिक गोष्टीवरच
अवलंबून असतात. त्यामुळे खेळ कमी झाला आहे. सत्यमेव जयते या कार्यक्रमात अमीरने
खेळ हा विषय ऐरणीवर धरून वेगवेगळे उदाहरण त्याने दिली. त्यात त्याने अखिलेश पॉल या
तरुणाचे उदाहरण दिले. अखिलेश हा वयाच्या १४ वर्षापासून व्यसनाच्या आहारी आणि
गुंडगिरी करण्यात गेला होता. आणि तो नागपूरच्या रस्त्या रस्त्यावर गुन्हे करत
होता. अखिलेश यांची टोळी असायची. हि टोळी कोणालाही मारणे, धमक्या
देणे, चोरी
करणे, इ.
प्रकार करत असत. दारु ,
गांजा
, सिगरेट
इ.व्यसन करत असत. तर काही दिवसापूर्वी ते एका महाविद्यालयाच्यासमोर उभे होते.
तेव्हा त्या महाविद्यालयामध्ये विजय बरसे सर होते. त्यांनी महाविद्यालयाच्या
शिपायांना सांगितले कि त्या मुलांना इकडे बोलून घेऊन ये. तेव्हा त्या मुलांना
महाविद्यालयात बोलवले. बरसे सरांनी सांगितले कि तुम्ही फुटबॉल खेळणार का ? हा
प्रश्न विचारल्यावर त्या मुलांनी त्यांना वेड्यात काढले.बरसे सर म्हणाले कि मी
तुम्हाला तासाचे ५ रुपये देणार. तर ती मुल म्हणाली कि ह्याला वेडबिड लागले तर नाही
ना. त्यातलाच एक मुलगा म्हणाला कि अरे सोड जाऊ दे ना आपल्याला
५ रुपये तर भेटतायत ना मग असू दे आपण खेळू या. असे १० ते १५ दिवस ती मुल खेळली , नंतर ती मुल परत नेहमी प्रमाणे खेळायला निघाली तेव्हा बरसे सर म्हणाले कि
आज खेळायचे नाही. तर मुलांनी विचारले कि का नाही खेळायचे तर बरसे सर म्हणाले आज
माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर ती मुल म्हणाली कि पैसे नाही आहेत तर आपण नाही
खेळायचे, असे
म्हणून ती मुल निघून जातात. तेव्हा त्यांच्यापैकी एक जण म्हणतो कि ठीक आहे ना आज
पैसे नाही भेटले म्हणून काय झाले पण आपण खेळूया. असे म्हणून ती मुल फुटबॉल खेळायला
जातात. ती मुल परत महाविद्यालयात जातात तेव्हा सर सांगतात कि फुटबॉल घ्या पण परत
जागेवर आणून ठेवा. पण हे त्याच्या लक्षात आले नव्हते कि आपण खेळाच्यामुळे व्यसन
आणि गुंडगिरी विसरलो आहोत. असे काही दिवस निघून जातात.अखिलेशच्या नावावर अनेक
केसेस असतात. तेव्हा त्याचा एक वकील भेटतो. तो त्याला पी. आई. कडे घेऊन
जातो. अखिलेश सरेंडर होतो.काही दिवसांची तो जामीनावर सुटून बाहेर येतो. एक दिवस तो
काही मुलांच्या सोबत त्याच्या मागावर गेला ती मुल फुटबॉल खेळायला जात होती. तो एका
गाडीच्या बाजूला उभा राहिला त्यांना बघायला लागला. तोचं लांबून एक माणूस येत होता
तेव्हा मुल म्हणत होती कि सर आले सर आले. तर ते अखिलेशच्या बाजूला येऊन उभे
राहिले. तर अखिलेश त्यांना बघून आवक झाला.ते बरसे सर होते. सर म्हणाले कि कसा
आहेस. तेव्हा अखिलेश म्हणतो कि जसा पाहिला होतो तसाच आहे. त्याला सर खेळायला
सांगतात. तेव्हा त्याला आपले पहिले जुने दिवस आठवतात. काहीही विचार न करता तो लगेच
खेळायला जातो.अखिलेश हा आता एक चांगला फुटबॉल पटू आहे. तो आता स्वतः एक
फुटबॉल कोच आहे. अखिलेश स्टेट आणि national
लेवलवर
खेळतो. तो अनेक मुलांना फुटबॉल शिकतो. त्याच्या टीम मध्ये जी मुल खेळतात ती
गोरगरीब व झोपडपट्टीतील मुल खेळतात.
दुसरे
उदाहरणं हे एका छोट्या मुलाचे दिले गेले होते त्याचे नाव शुभम त्याचे वय ९ वर्ष
आहे.तो एक आपल्या वयामध्ये वल्ड गोल्फ champion
आहे.
शुभमचे घराणे हे कुस्तीपटू होते. पण ह्या मुलाला गोल्फचे वेड होते तो गोल्फचे ६० %
शिक्षण हे यु टूब या साईट वरून घेतले होते.शुभमला गोल्फचे ते महागडे सेट परवडणारे
नव्हते. पण तरी त्याची त्या खेळातील रुची पाहून त्याला त्याच्या वडिलांनी खूप
प्रोत्साहन दिले. शुभम हा आपल्या घरी हरियाणामध्ये शेतात जाऊन गोल्फचा सराव
करत असे.तो भांडी ठेऊन सराव करायचा. नंतर त्याला दिल्लीला अमित लूथरा यांनी
बोलावले. अमित लूथरा हे गोल्फ फाउंडेशन चालवतात. जगातील सर्वश्रेष्ठ गोल्फ खेळाडू ग्यारी
बरोबर २ वेळा खेळला.
अशा
प्रकारे खेळ हा एखाद्या माणसाचे आयुष्य बदलून टाकतो. अशा प्रकारे अनेक उदाहरण अमीर
खानने दिली आहेत.
एक
गेंद दुनिया बदल सकती है|
जय
हिंद सत्यमेव जयते|
No comments:
Post a Comment